Wednesday, June 3, 2009

लातुरच्या राजस्थान विद्यालयात तोडफोड

अहो, लातुरचा उल्लेख असला म्हणून काय झालं, नांदेडशीच संबंधित आहे ही बातमी.

अरे नाही, कोणत्या राजकीय वादातून नाही झाली ही तोडफोड.
अहो तुम्हाला तर माहितच आहे ना, आपल्या मुखेड तालुक्यातील १२वीच्या परिक्षेतील सामुहिक कॉपी प्रकरण!
तेच ते, ज्यात सुरूवातीला लातुर बोर्डाने फक्त १६० परिक्षार्थ्यांनाच चौकशीकरीता बोलाविलं होतं पण नंतर अधिक चौकशीनंतर विद्यार्थ्यांची हीच संख्या ३,००० पर्यंत पोहोचली.

उद्या महाराष्ट्रात सगळीकडे १२ वीचा निकाल लागेल, पण मुखेडच्या या ३,००० विद्यार्थ्यांना मात्र निकालासाठी अजून बरीच वाट पाहावी लागण्याचे चिन्हं दिसत आहेत कारण लातुर बोर्डाने या सर्वच्या सर्व ३,००० विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे.



याच विद्यार्थ्यांच्या संतापाचा फटका आज दुपारी लातुर येथील राजस्थान विद्यालयाला बसला.
विद्यार्थ्यांनी परिसरात जोरदार घोषणाबाजी करत तोडफोड केली, तसेच पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी केलेल्या सौम्य लाठीमारात एका पत्रकाराचा कॅमेराही फुटला त्यामुळे स्थानिक पत्रकारांनी एकत्र येऊन पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली.



या विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉफी केल्याचा आरोप महाविद्यालय आणि मंडळाचा असून, विद्यार्थ्यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. महाविद्यालयाने जाणून-बुजून निकाल राखीव ठेवले असून, हे निकाल जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.



बघुयात पुढे हे प्रकरण काय वळण घेते.

या बातमीच्या अपडेट वेळोवेळी पोस्ट करण्यात येतील.




ता. . :- (
मंगळवार ४ जून, ९:३० AM)
आमचे मित्र सौरभ कौरवार यांनी आम्हाला हा व्हिडीओ पाठविला आहे.
हा व्हिडीओ त्यांनी स्वतःच्या मोबाईलमधून शूट केला आहे.
काल जेव्हा तोडफोड झाली, तेव्हा सौरभ कौरवार हा राजस्थान विद्यालयातच होता.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

2 comments:

साधक said...

आभारी आहे बातमी बद्दल. मी या शाळेचा विद्यार्थी.

सौरभ said...

अरे देवा.
शाळेचं नुकसान करायला नको होतं यांनी.

Post a Comment

Post a Comment